Pm Kisan Yojana Update: राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी नवीन नियम; शेतकऱ्यांकडे ओळखपत्र नसेल, तर पीएम किसानचे पैसे भेटणार नाही!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana Update: पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक हा अनिवार्य करण्यात आलेला आहे. मित्रांनो या हप्त्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आलेल्या आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना कुटुंबामधील सर्व सदस्याचे आधार लिंक करणे आवश्यक आहे. खरंतर प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्या ऍग्रिस्तक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधार लिंक करण्याची व शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. पीएम किसानच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कुटुंबामधील सर्व सदस्यांचा आधार क्रमांक जोडणे हा अनिवार्य आहे. व सोबतच शेतकरी ओळख क्रमांकाची अट देखील लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन शेतकरी ओळख क्रमांक मिळवू शकता.Pm Kisan Yojana Update

हेही वाचा 👉 अर्थसंकल्पापुर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; अर्थमंत्र्यांनी केली पीएम किसान सन्माननिधी योजनेबाबत घोषणा, पहा सविस्तर माहिती!

नवीन अट ही काय आहे?

पीएम किसान सन्माननिधी योजनेचा १९ वा हप्ता हा 24 फेब्रुवारी रोजी वितरित केला जाणार आहे, आणि या हप्त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांकची अट लागू होणार नाही. पण मात्र 20 वा हप्त्यापासून शेतकरी ओळखपत्र बंधनकारक होणार आहे. तथापि, नवीन नोंदणी करणारे शेतकऱ्यांसाठी पती-पत्नी आणि अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या कुटुंबांमधील सदस्यांची आधार नोंदणी अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाचे पालन केले नाही तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे मिळवण्यास शेतकरी पात्र ठरणार नाही.

शेतकऱ्यांची संख्या व ई-केवायसी स्थिती ही काय आहे?

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 96 लाख 67 हजार पात्र लाभार्थी आहे यापैकी 95 लाख 95 हजार लाभार्थ्यांची नोंदणी जमिनीच्या नोंदणी नुसार झालेली आहे. तर 78 हजार लाभार्थ्यांनी त्यांच्या जमिनीच्या नोंदी अध्यायावत केलेल्या नाहीत, याशिवाय 95 लाख 16 हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणिकरण पूर्ण केल्या आहे. तर 1 लाख 89 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायशी पूर्ण झालेली नाही.

हेही वाचा 👉 अर्थसंकल्पापुर्वी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; अर्थमंत्र्यांनी केली पीएम किसान सन्माननिधी योजनेबाबत घोषणा, पहा सविस्तर माहिती!

बँक खात्याला आधार लिंक करण्याची स्थिती काय आहे?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 94 लाख 55 हजार लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडले गेले आहे. तर एक लाख 98 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड अजून जोडलेले नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!