Cotton Market News: केंद्र सरकारने देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी “मिशन फॉर कॉटन प्रॉडक्टिव्हिटी” नावाची नवीन योजना जाहीर केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये ही महत्त्वाची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. शिवाय, शेतकऱ्यांना अतिरिक्त लांब धाग्याच्या वाणांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.Cotton Market News
भारतीय कापूस उत्पादकांना मोठा फायदा:
गेल्या काही वर्षांपासून भारतातील कापूस उत्पादकता कमी होत आहे. अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि इजिप्त सारख्या देशांमध्ये कापूस उत्पादकता भारताच्या तुलनेत चारपट जास्त आहे. या देश आपल्या शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, सुधारित बियाणे आणि आधुनिक शेती पद्धती पुरवतात, त्यामुळे त्यांची उत्पादकता वाढते.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि अधिक उत्पादन घेण्यासाठी सरकारने 5 वर्षांचा “मिशन फॉर कॉटन प्रॉडक्टिव्हिटी” कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि सुधारित तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल, तसेच कापूस उद्योगालाही फायदा होईल.
भारतातील कापूस आयात कमी करण्यावर भर:
भारत दरवर्षी सुमारे 10 ते 12 लाख गाठी लांब धाग्याच्या कापसाची आयात करतो. हा कापूस प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांतून आयात केला जातो. मात्र, आता स्वदेशी उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने भारतीय शेतकऱ्यांना हाच कापूस देशातच मोठ्या प्रमाणावर उत्पादित करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आयात कमी होईल आणि शेतकऱ्यांना अधिक चांगला भाव मिळू शकेल.
मिशन फॉर कॉटन प्रॉडक्टिव्हिटी योजना काय आहे?
- ५ वर्षांसाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
- कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित बियाणे पुरवले जातील.
- शेतकऱ्यांना अतिरिक्त लांब धाग्याच्या कापसाचे वाण उपलब्ध करून दिले जातील.
- कापूस उद्योगासाठी “५ एफ धोरण” लागू केले जाईल, ज्यामुळे कापड उद्योगाला उच्च दर्जाच्या कापसाचा पुरवठा सुलभ होईल.
- शाश्वत कापूस उत्पादनासाठी केंद्र सरकार विशेष उपाययोजना करणार आहे.
शेतकऱ्यांना आणि उद्योगांना दुहेरी फायदा:
ही योजना केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही तर भारतीय वस्त्रोद्योगासाठीही महत्त्वाची ठरेल. सुधारित कापूस उत्पादनामुळे देशांतर्गत कापड निर्मिती वाढेल, निर्यात सुधरेल आणि देशाचा महसूल वाढेल. तसेच, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल आणि त्यांना अधिक चांगले दर मिळू शकतील.
सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये उत्साह:
सरकारच्या या घोषणेमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वी अनेक वर्षे शेतकऱ्यांनी या प्रकारच्या योजना राबविण्याची मागणी केली होती. आता प्रत्यक्षात ही योजना लागू झाल्यास भारतातील कापूस उत्पादनात मोठी वाढ होईल आणि भारतीय शेतकरी जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षम होतील.
ही बातमी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरोखरच आनंदाची आहे. सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य सुधारण्यास मदत होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
1 thought on “Cotton Market News: कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!”