Adhar kard apdets: आधारकार्ड मृत्यूनतर कसे बंद होत आहे, किंवा मृत्यूनतर आधारकार्ड नबरचे काय होते आहे, असे प्रक्ष तुम्हाला अनेकदा पडले असतील याचंच उत्तर आज तुम्हाला या लेखामध्ये सागणार आहोत. आधारकार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी सर्वांत महत्वाचे दस्तऐवज आहे. Aadhaar Card वर लिहिलेला 12 अकी क्रमाक हा आयुष्यात एकदाच दिला जातो. परिस्थितीत मृत्यूनंतर Aadhaar Card बंद करण्याचा नियम काय, जाणून घ्या.Adhar kard apdets:
Aadhaar Card हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. Aadhaar Card वर लिहिलेला 12 अंकी क्रमांक आयुष्यात एकदाच दिला जातो. पण, Aadhaar Card मृत्यूनंतर कसे बंद होते, किंवा मृत्यूनंतर Aadhaar Card नंबरचे काय होते, याविषयी आम्ही आज माहिती देणार आहोत.
आधारकार्ड हे सरकारने जारी केलेले सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. आधारकार्ड हे ओळख म्हणून मागितले जाते. कोणत्याही सरकारी किंवा अशासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधारकार्ड ची पहिली मागणी आहे. आधारकार्ड तयार करताना नाव, पत्ता आणि फिंगरप्रिंट सारखे तपशील घेतले जातात, त्यानंतर 12 अंकांचा युनिक नंबर मिळतो. हा आधारकार्ड नंबर व्यक्तीसाठी आयुष्यात एकदाच दिला जात असतो.
नागरिकांच्या मृत्यूनंतर आधारकार्ड चे काय होते? आधारकार्ड जारी करणारी संस्था UIDAI ने यासाठी काही नियम केले आहेत का? आधारकार्ड कसे निष्क्रिय करावे? सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळतील. जाणून घ्या.
आधारकार्ड लॉक कसे करावे?
आधारकार्ड लॉक करण्याची सुविधा आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर UIDAI च्या साईटवर जाऊन तुम्ही त्यांचे आधारकार्ड लॉक करू शकता, असे केल्याने कोणीही आधारकार्ड वापरू शकत नाही. आधारकार्ड लॉक केल्यानंतर तो सुरक्षित ठेवावा.
आधारकार्ड लॉक करण्याच्या स्टेप्स फॉलो करा
- आधारकार्ड लॉक करण्यासाठी सर्वप्रथम UIDAI च्या साईटवर जा.
- मुख्य पानावर, ‘माय आधार मेनू’मध्ये आधार सेवा विभागात निवडा.
- यानंतर तुम्हाला ज्याला लॉक करायचे आहे त्याचा आधारकार्ड नंबर आणि कॅप्चा भरा.
- नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी प्रविष्ट करा आणि लॉक/अनलॉक पर्याय निवडा.
- यानंतर काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करा आणि पुढील करा.
- येथे सांगण्यात येईल की, लॉक केल्यानंतर पुन्हा अनलॉक केल्याशिवाय तुम्हाला आधारकार्ड बायोमेट्रिक वापरता येणार नाही.
कोणी आधार लॉक करू शकेल का?
फसवणूक टाळण्यासाठी आधार कार्डचे बायोमेट्रिक डिटेल्स लॉक ठेवता येतात आणि गरज पडल्यास ते पुन्हा अनलॉक करता येतात. लॉक/अनलॉक करण्यासाठी मोबाईल नंबर आधारशी लिंक करणे आवश्यक आहे.