Mukhymantri Yuva karyaprashikshan Yojana: महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकार हे अनेक योजना राबवत आहे. अशातच महिलांसाठी खास करून हे राज्य सरकार योजना राबवत आहे. व या योजनांची देखील पूर्णपणे अंमलबजावणी करीत आहे. व आता युवा पिढीसाठी राज्य सरकार योजना आणत आहे. चला तर या योजने बद्दल माहिती जाणून घेऊया.Mukhymantri Yuva karyaprashikshan Yojana:
शिक्षण पूर्ण झालेल्या युवकांसाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना आणलेली आहे. तर या योजनेच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची बारावी उत्तीर्ण असतील, अशा विद्यार्थ्यांना 6000 रुपये व पदवीधारक किंवा आयटीआय विद्यार्थ्यांना 8000 रुपये भेटतील. तर त्यामध्ये जे विद्यार्थ्यांची पदवी उत्तीर्ण असल्यास त्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये देण्याचा असा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. या योजनेसाठी आतापर्यंत 4 लाख 79 हजार 918 युवकांनी अर्ज हे दाखल केलेले आहेत. तर याबाबतची माहिती शासनाकडून देण्यात आलेले आहेत.
तर या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी लागणारी 5,500 कोटी रुपयांची तरतूद
या योजनेमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना ही राबवलेली आहे. या योजनेसाठी 5500 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहेत. उमेदवार हा किमान 18 ते 35 वयोगटातील असणार आवश्यक गरजेचं आहे.
याच दरम्यान या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी या युवांना भेटणार आहे. या योजनेसाठी आतापर्यंत 3 लाख 54 हजार 64 युवांनी नोंद केली आहे. व तसेच 10 हजार 356 खाजगी व शासकीय आस्थापनांनी देखील यामध्ये नाव नोंदणी केलेली आहे.
या योजनेच्या माध्यमातून 4 लाख 5 हजार 626 रोजगारांच्या संधी निर्माण
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेच्या माध्यमातून 4 लाख 5 हजार 626 रोजगारांच्या संधी यामध्ये निर्माण होत आहेत. व या योजनेच्या अंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6 हजार रुपये व आयटीआय आणि पदवीधारक विद्यार्थ्यांना 8 हजार रुपये भेटणार आहेत. तर पदवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये 10 हजार रुपये विद्यावेतन हे भेटणार आहे. या माध्यमातून उद्योगासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. व यापुढे देखील या योजनेसाठी 4 लाख 79 हजार 918 युवकांनी अर्ज केलेले आहेत. व आतापर्यंत या योजनेसाठी कमीत कमी एक लाख 69 हजार 988 उमेदवारांची निवड देखील झालेली आहे. व यापैकी 82 हजार 281 युवक व युवती प्रत्यत्र रुजू झाले असल्याची माहिती सरकारने दिलेल्या आहेत.
खासगी आणि शासकीय आस्थापनांमध्ये रोजगाराच्या भेटणाऱ्या संधी
यामध्ये प्रामुख्याने अनेक उद्योग देखील करता येत असतात. यामध्ये लघु व मध्यम तसेच मोठे उद्योग, स्टार्टअप, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळ, सामाजिक संस्था व विविध आस्थापना इत्यादींचा व यामध्ये आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवलेली जात आहे.
किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र राहत असतील. या अशा आस्थापना व उद्योगांमध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे 10 लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी आर्थिक वर्षामध्ये या योजनेच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होत असतील. तर अशाच प्रकारे या युवांना या योजनेची संधी मिळण्यासाठी राज्य सरकार हे लवकरच या योजनेची अंमलबजावणी ही पूर्णपणे महाराष्ट्र राज्यामध्ये करणार आहे.