Big Decision For Farmers: तब्बल 10 वर्षानंतर शेतकऱ्यांना भेटणार दिलासा; जाणून घ्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता घेतला निर्णय?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Big Decision For Farmers: नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विषयक विविध योजनांच्या आर्थिक निकषांमध्ये दहा वर्षानंतर वाढ करून केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा दिलेला आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या अंतर्गत देशभरामध्ये राबविण्यात येणाऱ्या अशा विविध योजनांच्या खर्चाचे निकष हे आता निश्चित केले गेले होते, यापुढे कांदा साठवणुकीसाठीच्या शीतगृहांनाही 35 टक्के अनुदान भेटणार आहे. केंद्राच्या या निर्णयांचा महाराष्ट्र राज्याला मोठा फायदा होणार आहे.Big Decision For Farmers

हेही वाचा 👉 हवामान विभागाचा अलर्ट जारी; राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊसाचे वातावरण, पहा कोणत्या भागात होणार पाऊस!

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत देशभरामध्ये फळे, फुले, भाजीपाला या पाल्यांसह शीतगृहे, हरितगृहे, शेडनेट, संरक्षित शेती, शेततळे, ठिबक सिंचन, काजू बोर्ड, नारळ बोर्ड यांसारख्या विविध योजना राबवल्या जात असतात. मित्रांनो तत्कालीन केंद्र सरकारने या योजनांच्या खर्चाचे आर्थिक निकष ठरवून दिलेले होते. व त्यानंतर अर्जावर खर्चाच्या निकषांमध्ये वाढ झालेली नव्हती. सध्याच्या महागाई व दरवाढ पाहता आर्थिक निकषांमध्ये केलेली वाढ तुटपुंजी आहे. पण जे मिळत आहे ते कमी नाही, असे म्हणत शेतकऱ्यांनी केंद्राच्या निर्णयांचे स्वागत केलेले आहे.

हेही वाचा 👉 हवामान विभागाचा अलर्ट जारी; राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊसाचे वातावरण, पहा कोणत्या भागात होणार पाऊस!

केंद्र सरकारच्या या निर्णयांमध्ये नेमके काय आहे?

  • कांद्याच्या साठवणुकीसाठी शेत गृह उभारण्यासाठी 35 टक्के अनुदान.
  • हरितगृह, शेडनेट उभारण्यासाठी स्टील ऐवजी बांबू व केबलचा वापर करण्यास परवानगी.
  • किरकोळ विक्रीसाठी व शेतीमालाच्या वाहतुकीसाठी वाहन खरेदीला 35 टक्के अनुदान.
  • मशरूम उत्पादन प्रकल्पासाठी 40 टक्के अनुदान व अत्याधुनिक उच्च दर्जाची फळे, फुलांच्या उती संवर्धित रोपांच्या रोपवाटिकेसाठी अनुदान.
  • जुन्या पारंपारिक रोपवाटिकेच्या आधुनिकीकरणासाठी 50 टक्के अनुदान.
  • बांबू रोपवाटिकेसाठी सरकारी प्रकल्पला 100 तर खाजगी प्रकल्पाला 50 एवढे अनुदान.
  • कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी भर.

अंमलबजावणीला देखील येईल गती,

कोरोना सारख्या महामारी नंतर संघटनेच्या वतीने सातत्याने आम्ही केंद्र व राज्य सरकारकडे आर्थिक खर्चाच्या निकषांमध्ये वाढ करण्याची मागणी करीत होतो, पण योजनाच रखडली होती. आता सुधारित मान्यतेमूळे योजनेच्या अंमलबजावणी गती येईल, अशी माहिती इंडियन ग्रीन हाऊस मॅन्युफॅक्चरर्स असोशियन चे महाराष्ट्र अध्यक्ष तेजोमय घाटगे यांनी दिली

हेही वाचा 👉 हवामान विभागाचा अलर्ट जारी; राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊसाचे वातावरण, पहा कोणत्या भागात होणार पाऊस!

केंद्र सरकारच्या निर्णयाची कार्यक्षम अंमलबजावणी करणार.

केंद्र सरकारने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांच्या खर्चाच्या निकषांमध्ये केलेली वाढ ही स्वागतारह आहे. कांदा साठवणुकीच्या शीतगृहांना अनुदान देण्याचा निर्णय कांदा उत्पादक यांना फायदेशीर ठरेल. कृषी विभागाच्या वतीने सर्व योजनांची कार्यक्षमपणे अंमलबजावणी केली जाईल. व केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. अशी माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्याला दिलेली आहे.

येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

1 thought on “Big Decision For Farmers: तब्बल 10 वर्षानंतर शेतकऱ्यांना भेटणार दिलासा; जाणून घ्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता घेतला निर्णय?”

Leave a Comment

error: Content is protected !!