Farmer Loan Wariyar: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी भेटणार, पहा सविस्तर माहिती!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Loan Wariyar: सरसकट सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर दिले होते. मात्र त्यांनी अजून कर्जमाफी विषयी एकही शब्द काढला नाही. दुसरीकडे शेतमालाचे भाव पडल्याने उत्पादनात केलेला खर्चही निघत नाही तर कर्ज कसे भरावे याचा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. बँकेतील कर्ज थकल्याने नवीन कर्ज मिळत नाही इतर लाभ खात्यात जमा झाल्यानंतर तू वळता केला जातो. त्यामुळे खुल्या बाजारात माल विकण्याची वेळ आल्याची हतबलता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतक-यांची ही परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर कर्जमाफीची तातडीने गरज असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले आहे.Farmer Loan Wariyar

हेही वाचा 👉 पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये या दिवशी होणार 2100 रुपये जमा; पहा लाभार्थी यादी!

विधानसभा निवडणुकी वेळेस प्रचारादरम्यान सर्वच पक्षाने शेतक-यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी देखील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. त्यामुळे शेतकरी आता कर्जमाफीची वाट पाहत आहे. परंतु सरकार स्थापन होऊन आता एक महिना होऊन गेला तरी देखील शेतक-यांच्या प्रश्नाविषयी कोणताही निर्णय घेतला नाही. तसेच कर्जमाफी करण्यासंदर्भातील मुद्दे ही बैठकीमध्ये चर्चेला देखील आणत नाहीत. त्यामुळे सरकार कर्जमाफीला बगल देत आहे की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

निवडणफी वेळेस महायतीकडून कर्जमाफीचा जोरदार प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्याच बैठकीत कर्जमाफी जाहीर होईल अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. निवडणुकीत भाजपाला ऐतिहासिक एक हाती सत्ता मिळाली, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतक-यांची कर्जमाफी करतील अशी अपेक्षा शेतक-यांना लागली. मात्र आत्तापर्यंत झालेल्या सर्व बैठकांमध्ये कर्जमाफी विषमी चर्चा देखील करण्यात आलेली नाही.

हेही वाचा 👉 पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये या दिवशी होणार 2100 रुपये जमा; पहा लाभार्थी यादी!

एवढेच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कर्जमाफी विषयी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी चिंता करणारे वक्तव्य नुकतेच केले आहे. माझ्या तोंडून कर्जमाफीचे आश्वासन ऐकले का? अंथरूण पाहून हात पाय पसरावे अशाही सल्ला त्यांनी दिला. त्यांच्या पा वक्तव्यानंतर शेतकन्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे. खरंच सरकार कर्जमाफीला बगल देत आहे का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.

सध्या बाजारात कोणाच्या शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्यामुळे राज्यातील शेतकन्यांचे महत्त्वाचे पिके असलेले कापूस आणि सोयाबीनला हमीभावापेक्षा 800 ते हजार रुपये कमी दर मिळत आहे. तर हरभरा उडीद मूग ज्वारी केळी संत्रा मोसंबी बिरू या पिकांचे भाव देखील कमी आहेत. पिकाच्या उत्पादनात झालेला खर्चडी उत्पादनातून निघत नाही. मग शेतकऱ्याऱ्यांनी पीक कर्ज कसे भरावा? त्यामुळे शेतकन्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी.

हेही वाचा 👉 पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये या दिवशी होणार 2100 रुपये जमा; पहा लाभार्थी यादी!

बशेतक-यांचे कर्ज थकल्याने बैंक शेतक-यांना नवीन कर्ज देत नाहीत, तसेच इतर लाभ खात्यात जमा झाल्यानंतर ते कर्ज खात्यात वळता केला जात आहे. असे शेतकन्यांच्या वतीने सांगण्यात पेत आहे. शिवाय सोयाबीन आणि कापसाचे हमीभावाने खरेदी केल्यानंतर खात्यात पैसे जमा झाले नाहीत आणि कर्ज चकले असल्यामुळे कपात केली जात आहे. त्यामुळे नाईलाजाने खुल्या बाजारात कमी भावात कपूस आणि सोयाबीन विकावे लागत असल्याचे शेतक-यांनी सांगितले आहे. यामुळे शेतक-यांची दोन्ही बाजूने कोंडी होऊन आर्थिक फटका बसत आहे,

येथे क्लिक करा 👉 अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा.

1 thought on “Farmer Loan Wariyar: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी भेटणार, पहा सविस्तर माहिती!”

Leave a Comment

error: Content is protected !!