Free Ration Date in Maharashtra: केंद्र सरकार हे देशातील व राज्यातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना आता राबवत आहे. अशातच आर्थिक लाभ देणाऱ्या व तसेच अनुदान देणाऱ्या इतरही अनेक प्रकारच्या योजना राबवलेल्या आहेत. यामधील एक फायदेशीर योजना म्हणजे, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आहे. ज्या योजनेच्याद्वारे केंद्र सरकार हे पात्र नागरिकांना मोफत राशन पुरवते. व या योजनेच्या माध्यमातून लोकांना गहू व तांदूळ यासारख्या गोष्टी दिल्या जात आहेत. ज्या त्यांना शासकीय रेशन दुकानांमध्ये भेटतात.Free Ration Date in Maharashtra:
तसेच रेशनशी संबंधित एक मोठी बातमी समोर आलेली आहे. ज्यामध्ये भारत देशातील केंद्र सरकार हे आता पाच वर्षासाठी नागरिकांना मोफत राशन देण्याचा निर्णय घेत आहे. तर या निर्णयांमध्ये कोणत्या कुटुंबातील लाभार्थ्यांना लाभ भेटणार आहे? व या धान्याचा लाभ हा कोणत्या कुटुंबाला मिळेल? चला तर मग याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊया.
आता 5 वर्षासाठी मिळणार मोफत राशन
प्रधानमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लोकांना मिळत असणारे हे मोफत राशन आता पुढील 5 वर्षे देखील मोफतच मिळत राहील. म्हणजे तुम्हाला आता हे राशन 2028 पर्यंत मोफत मिळेल. केंद्रीय मंत्री मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय हाती घेतलेला आहे. व पौष्टिक घटकांनी समृद्ध तांदूळाचा मोफत पुरवठा हा सन 2028 पर्यंत सुरू ठेवण्याचा हाती घेतलेला आहे. 17,082 कोटी रुपये खर्च करून ही योजना नागरिकांसाठी 2028 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे.
या योजनेअंतर्गतचा तुम्हाला लाभ मिळेल का?
केंद्र सरकारने कोरोनाच्या काळामध्ये मोफत राशन देण्याची घोषणा देखील केलेली होती. परंतु आता त्याचा लाभ हा फक्त दारिद्र्यरेषेखालील किंवा त्या खालील जीवन जगत असणाऱ्या लोकांनाच भेटेल. याशिवाय तुमच्याकडे रेशन कार्ड असणे आता बंधनकारक आहे. व ज्या नागरिकांकडे केशरी रंगाचे रेशन कार्ड असेल, अशा लोकांना या योजनेचा लाभ हा भेटतो.
यासाठी कोणते नागरिक राहणार पात्र?
- भूमिहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी व ग्रामीण कारागीर.
- विणकर, लोहार, सुतार व गरीब झोपडीत राहणारे.
- हमाल, रिक्षावाले, सर्पमित्र, चिंध्या वेचणारे व निराधार इत्यादींसाठी ही योजना पात्र ठरणार आहे.
मित्रांनो तुम्ही पहिलाच असेल, की केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 2028 पर्यंत नागरिकांसाठी मोफत राशंचा लाभ दिल जाणार आहे. यामध्ये गरीब कुटुंबातील प्रत्येक सदस्य नुसार 5 किलो धान्य हे मोफत देण्यात येईल.
4 thoughts on “केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 2028 पर्यंत भेटणार मोफत राशन, तुम्हालाही भेटेल का नाही? ते पहा!”