Ladki Bahin Yojana Update: निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लागू केली होती, आणि या योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांना सरसकट या योजनेचे पैसे देखील देण्यात आले. पण मात्र आता हे महायुती सरकार आल्यामुळे या योजनेचे निकष आता कठोर केले जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आणि या योजनेसाठी पात्र नसलेल्या महिलांना या योजनेचा पुढील हप्ता भेटणार नाही. त्यामुळे आता काही लाभार्थी महिला या अपात्र ठरण्याची शक्यता आहे. चला तर मित्रांनो आपण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.Ladki Bahin Yojana Update
आतापर्यंत कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भामध्ये तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्जाची पूर्णपणे छाननी केली जाईल. व त्यानुसार निकष बाह्य अर्ज हे अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार छगन भुजबळ यांनी अपात्र लाडक्या बहिणींना इशारा दिला आहे. या नियमांमध्ये न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून आपली नावे योजनेमधून काढून टाकायला हवेत असं म्हणाले आहेत.
छगन भुजबळ हे या योजनेबाबत काय म्हणाले?
अपात्र महिलांनी योजनेमधून आपलं नाव काढून देण्यासाठी त्यांना आवाहन केलं पाहिजे. व तसेच सरकारने आतापर्यंत ज्या अपात्र महिलांना या योजनेचे पैसे दिले आहेत, ते परत मागण्यात काही अर्थ नाही. सरकारने ते पैसे आतापर्यंत करू नयेत, मात्र लोकांना यापुढे सांगावे की नियमांमध्ये न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून आपलं नाव या योजनेमधून काढून घ्यावे. अन्यथा त्यांच्यावरती दंड हा आकारला जाऊ शकतो. याआधी आपण जे पैसे दिले आहेत, ते आपण लाडक्या बहिणींना अर्पण केले असे समजूया ते परत घेवु नये.
तर उदय सामंत हे काय म्हणाले?
सत्तेवरती महायुतीचे सरकार आले असल्यामुळे या राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने योजना बंद करू शकतं. अशी चर्चा सध्या चालू आहे या वरती मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिल आहे की, लाडक्या बहिणींमुळे आम्ही पुन्हा सत्तेमध्ये आलो आहोत, ज्याच्यामुळे आम्हा सर्वांना पुन्हा एकदा सत्य पर्यंत जाता आलं आहे. अशा लाडक्या बहिणींनी राज्यातील ज्येष्ठ नागरिक व तरुणांमुळे आम्ही पुन्हा सत्तेत बसलो आहोत, त्यांच्यासाठी सरकारने योजना सुरू केली आहे. व त्या योजना पूर्णपणे खंडित होणार नाहीत, व योजना ही बंद केली जाणार नाही.
याच दरम्यान सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही, असे देखील मंत्री आदिती तटकरे आणि पष्टपणे सांगितलेलं आहे.
येथे क्लिक करा 👉 अशाच, माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.