Maharashtra: महाराष्ट्र राज्यामधील जे तरुण बेरोजगार आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशा बेरोजगार तरुणांसाठी आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेद्वारे प्रत्येक पात्र तरुण-तरुणींना दरमह 6 ते 10 हजार रुपये विद्यावेतन दिले जात आहे.Maharashtra:
विधानसभेच्या या आचारसंहितेमुळे महाराष्ट्र राज्यातील 6 लाख प्रशिक्षणार्थीना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे या दोन महिन्यांचे विद्यावेतन मिळालेले नाही. आचारसंहिता संपलेली असतानाही या योजनेमधील लाडक्या भावा-बहिणींना दोन महिन्यांचे विद्यावेतन मिळालेले नाही. पदरमोड शक्य नसल्यामुळे अनेकांनी प्रशिक्षण अर्ध्यातूनच सोडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. दरम्यान, आता महायुती सरकार टप्प्याटप्प्याने एक लाख पदांची मेगाभरती करेल, असा विश्वास सुशिक्षित तरुणांना आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणची पहा स्थिती
- दरवर्षीचे उद्दिष्ट
- १० लाख
- वार्षिक तरतूद
- ५,५०० कोटी
- बारावी उत्तीर्णांना विद्यावेतन
- ६,०००
- ‘आयटीआय’ धारकांना लाभ
- ८,०००
- पदवी-पदव्युत्तरांना दरमहा
- १०,०००
हे महायुती सरकार करणार 1 लाख पदांची मेगाभरती !
महाराष्ट्र राज्याच्या 43 शासकीय विभागांमध्ये सद्य:स्थितीत सव्वादोन लाख पदे ही रिक्त आहेत. मागील 6 ते 7 वर्षांपासून अनेकदा मेगाभरतीच्या नुसत्या घोषणा झाल्या आहेत, पण कार्यवाही 100 टक्के सुद्धा झाली नाही. आता 2025 2029 या 5 वर्षांत साधारणतः 1 लाख पदांची भरती करण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने केले आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ही मेगाभरती केली जाणार असून, या भरतीत प्रशिक्षण योजनेमधुन 6 महिन्यांचे प्रशिक्षण घेतलेल्यांनाही संधी मिळू शकते. त्यामुळे बहुतेक तरुण व तरुणी शासकीय कार्यालयांमध्येच प्रशिक्षण मिळावे, असे आग्रही असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.