Maharashtra Rain Update: राज्याच्या हवामानामध्ये मोठ्या बदल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये गुलाबी थंडीचा अनुभव घेतला पण आता राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची फजिती होताना पाहायला मिळत आहे.Maharashtra Rain Update
हवामान खात्याने आज देखील पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांना आज पावसाचा येली अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.
राज्य मध्ये सातत्य हवामानात बदल पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यात थंडी गायब झालेली असून राज्यातील काही ठिकाणी द्वगाळ आणि दमट वातावरण झाले आहे. त्यामुळे थंडी ऐवजी गरमीच वाढले आहे. थंडी गायब झाल्यामुळे नागरिकांना उकाड्याचे त्रास जाणू लागलेले आहे. अशा मध्ये काही ठिकाणी पाऊस देखील पड़त आहे, त्यामुळे बळीराजा चिंतेत आलेला आहे. हाता तोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे वायला जाणार का असा प्रश्न सध्या त्यांच्यासमोर उपस्थित झालेला आहे काही शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी देखील येत आहे.
जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे नागरिकांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन काळजी घ्यावी अशी आवाहन करण्यात आलेले आहे.