Panjabrao Dakh: नमस्कार शेतकरी मित्रांनो पंजाबराव डखांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आलेला आहे. आता लवकरच महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून हा माघार घेईल, असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाची दाट शक्यता ही हवामान अंदाज तज्ञांनी वर्तवलेली आहे. चला तर मग पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे ते आपण जाणून घेऊया.Panjabrao Dakh:
हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी हवामान अंदाजानुसार वर्तवलेल्या महाराष्ट्रातील नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, अहमदनगर, सांगली, सातारा, सोलापूर, कोकण, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र, संभाजीनगर, जालना या भागामध्ये तुरळक काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे.
पण मात्र या पावसाची तीव्रता ही फार थोडीशी असणार आहे. पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे 19 व 21 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र राज्याला मान्सून हा चांगलाच झोडणार आहे. व या काळामध्ये राज्यातील विदर्भ मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागांमधील अनेक जिल्ह्यांमध्ये या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, वाशिम, बुलढाणा, अमरावती, औरंगाबाद, अकोला, जालना, बीड, जळगाव, उस्मानाबाद, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक व कोकण या विभागामध्ये चांगल्याच पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
मित्रांनो परंतु हे तीन ते चार दिवस महाराष्ट्रामध्ये खानदेश विभागामधील नंदुरबार व धुळ्यात या पावसाची तीव्रता ही अगदी कमी असण्याची शक्यता आहे. व दुसरीकडे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी तीन दिवसानंतर महाराष्ट्र राज्यात धुई येईल व यंदाचा मान्सून हा सुट्टी घेईल, असे सांगितलेले आहे.
व या धुई आणि धुके यायला जशी सुरुवात झाली म्हणजेच महाराष्ट्र राज्याला आता थंडीने झोडपायला सुरुवात होत आहे. 24 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रामध्ये धुई व धुके यायला हळूहळू सुरुवात होईल आणि मग त्यानंतर लवकरच थंडीला सुद्धा सुरुवात होऊन पूर्णपणे महाराष्ट्र राज्यामध्ये हिवाळा हा ऋतू लागेल.
हवामान तज्ञनांच्या अंदाजानुसार 22 ऑक्टोबरला उत्तर महाराष्ट्र मधून मान्सून हा माघारी निघेल. व त्यानंतर 23 ऑक्टोबर या दिवशी मराठवाड्यामधून माघारी फिरणार आहे आणि 24 ऑक्टोबरला तो संपूर्ण महाराष्ट्र राज्यांमधून निघून जाईल.
तसेच एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये 24 ऑक्टोबर पर्यंत हा मान्सूनचा मुक्काम तर राहणारच आहे. पण त्यानंतर मान्सून हा महाराष्ट्र राज्यांमधून पूर्णपणे माघारी फिरेल. व नंतर थंडीला हळूहळू सुरुवात होईल. व साधारणता 5 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे. असा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेला आहे.