शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त उरले 3 दिवस!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Pima Yojana: महाराष्ट्र राज्य शासनातर्फे रब्बी हंगामामध्ये या सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयांमध्ये पिक विमा योजना ही लागू केलेली आहे. तरी शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेऊन आपल्या या रब्बी हंगामामधील कांदा, गहू, हरभरा या पिकांचा विमा उतरावा असे आवाहन शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे.Pik Pima Yojana:

पिक विमा योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत किती आहे?

महाराष्ट्र राज्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना ही सन 2016 ते 17 पासून राबवण्यात येत आहे, आणि या खरीप हंगाम हा 2023 पासून महाराष्ट्र शासनातर्फे एक रुपयांमध्ये पिक विमा योजना लागू केलेली आहे. व या योजनेचा लाभ घेण्याची अंतिम मुदत ही 15 डिसेंबर पर्यंत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे.

चालू रब्बी हंगाम 2024-25 मध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या पिक विमा पोर्टल वरती या आणि केंद्र सरकारच्या संकेत स्थळाला भेट द्यावी असे आवाहनही करण्यात आलेले आहेत. या महाराष्ट्र राज्यामध्ये रब्बी हंगामामधील कांदा, हरभरा, गहू या पिकासाठी भाग घेण्याची मुदत ही दिलेली आहे. उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी मुदत ही 31 मार्च 2025 पर्यंत आहे. गतवर्षी रब्बी हंगामामध्ये 2023-24 मध्ये या विमा योजनेमध्ये साधारणता 71 लाख विमा अर्ज प्राप्त झालेले होते.

पिक विमा योजनेचा उद्देश नेमका काय?

नैसर्गिक आपत्ती कीड व रोगासारख्या अकल्प प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान हे मोठ्या प्रमाणावर झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देते. व तसेच पिकांच्या या नुकसानुच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य हे अबाधित राखणे, नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान आणि सामग्री वापरण्यास प्रोत्साहन मिळते. या कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठ्यामध्ये सातत्य राखणे, की ज्यामुळे उत्पादनातील जोखीम पासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा पिकांचे विधिकरण व कृषी क्षेत्राचा गतिमान विकास वाढण्यास मदत होईल.

खरीप हंगाम 2023 पासून महाराष्ट्र सरकारने एक रुपयांमध्ये पिक विमा योजना लागू केली आहे.

याच दरम्यान कृषी विभागाने व विमा कंपनीने यामधील अनेक बनावट प्रकार समोर आणलेले आहेत. खरीप हंगाम हा 2023 पासून महाराष्ट्र शासना मार्फत एक रुपयांमध्ये पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. आणि याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झालेला आहे. चालू रब्बी हंगाम 2024-25 मध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या पिक विमा पोर्टलवर भेट द्यावी असं आवाहनही करण्यात आलेल आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!