नव्या प्रणालीमुळे आता राशन कार्ड धारकांसाठी रेशन दुकानांमध्ये धान्य पोहोचले की लगेच त्यांच्या वाटेला किती धान्य आले आहे,आणि टोटल धान्य किती आले आहेत. असा मेसेज जाणार व त्यांनी भरल्यानंतरही एक मेसेज रेशन कार्ड धारकांना पोहोचणार. राशन कार्ड धारकांनी दुकानावरून धान्य घेतल्याचा मेसेज संबंधित लाभार्थ्यांच्या मोबाईलवर येणार आहे आणि यामुळे रेशन दुकानांमध्ये मिळणाऱ्या धान्याच्या या काळ्याबाजारावर मोठ्या प्रमाणामध्ये अंकुश लागणार, असा विश्वास या केंद्र सरकारकडून व्यक्त होत आहे.
या रेशन दुकानांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा ही कार्यान्वित करण्यात आलेली आहे. पण त्या गोदामामधून दुकानांमध्ये किती धान्य हे पाठविले जात आहे. व तसेच दुकानांमधून किती व कधी धान्य उचलले याची सर्व माहिती रेशन कार्डधारकांच्या मोबाईलवर एसएमएस द्वारे देण्यात येणार आहे.
मित्रांनो या प्रक्रियेमुळे रेशन वितरणाची ही सर्व प्रक्रिया एकदम पारदर्शक होणार आहे, आणि जो ओरिजनल लाभार्थ्या आहे त्यालाच या रेशनचा लाभ भेटणार आहे. असं केंद्र सरकारने स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे पुरवठा विभागाच्या या पावलांचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे, आणि यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना देखील दिलासा मिळेल.
रेशन कार्डधारकांनी देखील पुरवठा विभागाच्या या निर्णयाचे स्वागत केलेले असून, आता लवकरात लवकर ही सुविधा पूर्णपणे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये कार्यान्वित झाली पाहिजे, असी अशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आणि यासाठी मात्र नागरिकांनी देखील पुरवठा विभागाला पूर्णपणे सहकार्य करावे लागणार आहे.
रेशन कार्डधारकांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नियमित वापरात असलेला मोबाईल क्रमांक हा आपल्या आधार कार्डशी जोडून घेणे आवश्यक आहे. आणि यामध्ये विशेष बाब म्हणजे मोबाईल क्रमांक हा रेशन कार्ड सोबत जोडण्याची प्रक्रिया अगदी सोपीच असून यासाठी धान्य मिळणाऱ्या रेशन दुकानांमध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता देखील येणार आहे.