Sharad Pawar on Ladki Bahin Yojana: राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही लागू करून महाराष्ट्र राज्यातील कोट्यावधी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मानधन देण्याची सोय केलेली आहे. जुलैपासून महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची सुरुवात देखील झालेली आहे. तसेच 15 ऑक्टोबर पर्यंत या योजनेला मुदत वाढ ही देण्यात आलेली होती. कारण ज्या महिलांनी अर्ज भरलेले नाहीत त्यांना अर्ज करता येईल. व एका बाजूला महाराष्ट्र राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचाराचा केंद्रबिंदूच मानत असताना विरोधकांनी या योजनेवर आतापर्यंत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तर मित्रांनो महाविकास आघाडीने घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी या योजनेबाबतचे काही महत्त्वाचे भाष्य केलेले आहेत, ते आपण यामध्ये जाणून घेऊया.Sharad Pawar on Ladki Bahin Yojana:
महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची फसवणूक
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेमुळे महाराष्ट्र राज्य सरकारच्या वेळेवर भरपूर ताण येत असल्याचा प्रश्न हा महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये नेत्यांणा विचारण्यात आलेला होता. यावर शरद पवार म्हणाले की, महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे धोरण आणले, तर त्याचे समर्थन आम्ही सर्वच करतो. पण मुद्दा फक्त एकच आहे. की या महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना तात्पुरती आहे की कायमस्वरूपी? अशा प्रकारच्या योजना जाहीर केलेल्या जात असतात. किंवा राबविल्या जातात. तेव्हा प्रत्येक वर्षी महाराष्ट्र राज्य सरकारच्या अंदाजपत्रकामध्ये त्याबद्दल तरतुदी केल्या जातात. व यापैकी एकही तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये स्पष्टपणे केलेली नाही, आणि या योजना ह्या फक्त निवडणुकीपुरत्या केलेला उद्योग आहे. आमची खात्री आहे की, ही महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची एक प्रकारे फसवणूकच आहे.
महाविकास आघाडीचे सरकार आल्याच्या नंतर ही योजना बंद होणार?
महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करणार का? असा प्रश्न यावेळी विचारलेला आहे. त्यावर शरद पवार बोलताना म्हणाले की, आम्हाला या योजनेचे निश्चित स्वरूप हे तपासावे लागेल. व त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये किती तरतुदी केल्या आहेत. याची सर्व माहिती घ्यावी लागेल, आणि ही योजना राबवण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत असेल, तरच ही योजना चालू ठेवण्याबद्दल कोणताही विरोध नाही. पण ही योजना तात्पुरती आहे, याची खात्री आम्हाला व लाभार्थ्यांनाही पटली पाहिजे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ
महाराष्ट्र सरकारने यापूर्वी लाडकी बहीण योजनेची अर्ज भरण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंत ची मुदत दिलेली होती. पण त्यानुसार आता लाखो महिलांनी त्यांचे अर्ज सादर केलेले होते. व तसेच ज्यांनी ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये अर्ज सादर केले आहेत, त्या महिलांना या योजनेचा लाभ हा मिळाला आहे. या दरम्यान महाराष्ट्र राज्य सरकारने अर्ज करण्याची मुदत ही आता 15 ऑक्टोंबर पर्यंत वाढवलेली होती. व त्यामुळे महिलांना अर्ज करण्यासाठी पुन्हा एक संधी मिळालेली आहे, आणि महिलांकडून महाराष्ट्र राज्य सरकारच्या या निर्णयाचे खूपच चांगल्या प्रकारे आभार आभार मानले जात आहेत.